SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्याचे साखर आयुक्त डाॅ. संजय काेलते यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेट८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे आवाहनजयसिंगपूर रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर : आमदार यड्रावकरआंदोलकाबाबत समन्वयाने मार्ग काढला जाईल : पालकमंत्री प्रकाश आबिटकरकुरुंदवाडच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस ४९ कोटींची प्रशासकीय मंजुरी : आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यशमिळकत नांव हस्तांतरणासाठी 30 जुलै रोजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात विशेष कॅम्पकेडीसीसी बँकेला लावलेला दंड उत्स्फूर्तपणे भरला शेतकऱ्यांनीचसंसदेवरील मार्चमध्ये विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणारा RAF जवान निष्पन्न; CRPF च्या चौकशीत ७ राऊंड फायर केल्याची धक्कादायक माहिती उघड!दुथडी भरून वाहतीये पंचगंगा अन् कोल्हापूरकर मात्र कोरड्या घशाने त्रस्त! साता समुद्रापारही दुमदुमला 'विठ्ठल विठ्ठल'चा गजर; जर्मनीतील आषाढी वारीने जपली महाराष्ट्राची भक्तीपरंपरा

जाहिरात

 

जयसिंगपूर रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर : आमदार यड्रावकर

schedule27 Jul 26 person by visibility 162 categoryराज्य

◼️उमळवाड, कोथळी, दानोळी कवठेसार, जैनापूर, निमशिरगाव, कुंभोज, तीर्थक्षेत्र बाहुबलीसह परिसरातील गावांचा प्रश्न मार्गी 

जयसिंगपूर : जयसिंगपूर पलीकडील अनेक गावातील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न अखेर मार्गे लागला आहे. जयसिंगपूर येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा बहुप्रतिक्षित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रेल्वे फटकामुळे दिवसातून अनेक वेळा वाहतूक ठप्प होत असल्याने 
जयसिंगपूर पलीकडील उमळवाड, कोथळी, दानोळी कवठेसार, जैनापूर, निमशिरगाव, कुंभोज, तीर्थक्षेत्र बाहुबली सह परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

 रेल्वे फाटक बंद होत असल्याने रुग्णवाहिका, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच शेतकऱ्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. विशेषतः गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे, शिक्षणासाठी दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरीसाठी ये-जा करणारे कर्मचारी आणि शेतमालाची वाहतूक करणारे शेतकरी यांना या रेल्वे फाटकामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या मंजुरीमुळे वैद्यकीय सेवा, शिक्षण, नोकरदार वर्ग आणि शेतकरी यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे.

हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत रेल्वे उड्डाणपुलासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदविला.

उड्डाणपुलाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर जयसिंगपूर, कोथळी आणि परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे आभार मानले जात आहेत.
या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार असून, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, विद्यार्थ्यांचा प्रवास, नोकरदारांची वेळेची बचत आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ उड्डाणपूल नसून परिसराच्या विकासाला चालना देणारा आणि हजारो नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प ठरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes