SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वक्फ कायद्यावर उद्या पुन्हा सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- अंतरिम दिलासा देण्यासाठी मजबूत बाजू मांडण्याची गरजइचलकरंजी, हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेघोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथमकमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मासेमाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी?अलमट्टी उंचीवाढी संदर्भातील उद्याच्या बैठकीचा निरोप नाही : ... त्याची वाट बघू. पण या विषयात राजकारण करणे दुर्दैवी : आमदार सतेज पाटील दहावीच्या गुणपत्रिकांचे 26 मे रोजी वाटपकृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्र अधिक कार्यक्षम बनेल : डॉ. संतोष भावेअलमट्टी धरणाच्या उंचीविरोधातील 21 रोजी होणाऱ्या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाहीहुमणी कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण मोहिमेचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत प्रारंभ 'गोकुळ' दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळेंचा राजीनामा; गुरुवारी 22 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

जाहिरात

 

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मासेमाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी?

schedule20 May 25 person by visibility 223 categoryराज्य

▪️राज्यातील मासेमाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे 
मुंबई : महाराष्ट्र आणि गोवा जवळ असलेल्या अरबी समुद्रावर 21 मे रोजी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे आणि 24 मे पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही. या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नसणार आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान राज्याजवळील असलेला अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो.

▪️मासेमाऱ्यांनी कोणती सावधगिरी बाळगावी?
21 आणि 22 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील.

22 ते 24 दरम्यान रत्नागिरी, मुंबई, आणि पालघर जवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर खोल समुद्र जोरदार वाऱ्यामुळे अधिक प्रमाणात खवळलेला राहील.

मासेमारांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे, आणि स्वतःच्या सुरक्षितेसाठी 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्रातील खोल भागांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes