SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल“फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा” : प्राचार्य डॉ. जी. पी. माळीकोल्हापुरात १४ एप्रिल रोजी दसरा चौक मैदानावर प्रबोधन महासभेचे आयोजन मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबरराधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यूआर्थिक साक्षरता काळाची गरज : डॉ. उदयकुमार शिंदेघोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसंघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात 13 एप्रिल ते 18 एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणारडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' विषयावर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे : आ. सुहास बाबर

schedule11 Apr 26 person by visibility 173 categoryराजकीय

🟣 जयसिंगपूर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक 

जयसिंगपूर : मतदार यादीत अचूकता म्हणजेच निवडणुकीतील विजयाची गुरुकिल्ली, असा ठाम संदेश देत आमदार सुहास बाबर यांनी शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना बीएलए (मतदार यादी पुनरनिरीक्षण) मोहिमेत झोकून देण्याचे आवाहन केले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या विशेष मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरांत जाऊन मतदारांची नावे तपासणे, दुबार व मृत नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंद करणे अत्यावश्यक आहे.

  बीएलएचे ऑनलाईन प्रशिक्षणही तत्काळ सुरू होणार असून, जिथे मतदार यादी मजबूत, तिथेच सत्ता मजबूत, असा विश्वास बाबर यांनी व्यक्त केला. आज केलेले हे सूक्ष्म कामच उद्याच्या विजयाचा पाया ठरणार आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना दररोज किमान एक तास या कामासाठी देण्याचे निर्देश आमदार सुहास बाबर यांनी दिले. 

जयसिंगपूर येथील इंगळे सभागृहात बीएलए संदर्भात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत आमदार बाबर बोलत होते. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अनंत दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रारंभी स्वागत जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे यांनी केले. प्रस्ताविक जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केले. 

याप्रसंगी आमदार बाबर पुढे म्हणाले  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे पहावे लागेल, 
आमदार व खासदारांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात मोठे राजकीय यश मिळाले असून, विविध सत्ता केंद्रांवर नियंत्रण मिळवणे हे संघटित कामाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंद करणे हे आगामी निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर संघटनात्मक बैठका सुरू असून, त्याच धर्तीवर तालुक्यातही कामाची गती वाढविण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केल्यास भविष्यातील यश निश्चित असल्याचा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला. 

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडताना प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहणे गरजेचे असून, कामात निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांना विश्रांती देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

शिरोळ तालुक्यातील मेळाव्यात खासदार धैर्यशील माने यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी शिवसेना व शाहू आघाडीच्या एकजुटीमुळे तालुक्यात मोठे यश मिळाल्याचे नमूद केले.
मतदार यादीत दुबार नावे राहू नयेत, प्रत्येक नागरिकाला एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार असावा आणि महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश व्हावा, यासाठी बीएलएची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. १५ वर्षांसाठी तयार होणारी मतदार यादी अचूक ठेवणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत व इतर आगामी निवडणुकांसाठी ही प्रक्रिया निर्णायक ठरणार असून, घराघरात जाऊन मतदारांच्या अडचणी सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्यक्ष फिल्डवर काम करून पक्ष बळकट करावा, असेही खासदार माने यांनी ठामपणे सांगितले.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मतदार यादी पुनरनिरीक्षण मोहिमेत पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले. प्रत्येक बूथवर किमान दोन ते तीन कार्यकर्ते नियुक्त करून एकही मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील २० ते २५ दिवस अत्यंत निर्णायक असून, या काळात केलेले काम आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट परिणाम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यांनी सतर्क राहून घराघरात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेनेच्या संघटित ताकदीमुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करत, याच पद्धतीने आगामी निवडणुकांमध्येही विजय मिळवण्यासाठी शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 


यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शिरोळ शहर प्रमुख सतिश चव्हाण, पिंटू हेरवाडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 

कार्यक्रमास मुरलीधर जाधव, प्रमोददादा पाटील, समाजकल्याण सभापती श्रध्दाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, अमोल चव्हाण, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, सागर शंभुशेटे,  प्रा. चंद्रकांत मोरे, शितल गतारे, पंचायत समिती सदस्या दिप्ती जाधव, सिमा म्हैशाळे, अविनाश पाटील, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, प्रविण देसाई, बंटी पाटील, विजितसिंह शिंदे सरकार, अजिंक्य कदम, लता गाडेकर, पराग पाटील, उदय डांगे यांच्यासह युवासेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन बबन यादव यांनी केले.  आभार शिवसेना तालुकाप्रमुख उदय झुटाळ यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes