SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
एनसीसी भवनमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्नमान्सूनपूर्व तयारीचा आढावा: जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची प्रत्यक्ष पाहणीराधानगरी येथील शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश नोंदणी सुरूडीकेटीईच्या टेक्स्टाईल इंजिनिअरींग व डिप्लोमा विद्यार्थ्यांची शाही एक्सपोर्ट, शिमोगा येथे निवडसैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी 8 जून रोजी मुलाखतपद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादनकोल्हापुरात ‘चालुक्य क्रीडा महोत्सव २०२६’ चा थरार; १७ मे पासून १० विविध खेळांचे विनामूल्य आयोजनपर्यावरणाचा समतोल आणि मधमाशी दिनकोल्हापूर : अनाधिकृत बांधकाम कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती नकार; महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेशकोल्हापूर जिल्ह्यात 2 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

जाहिरात

 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभा

schedule05 Apr 26 person by visibility 395 categoryदेश

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून दिग्गज नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कूचबिहार आणि अलीपुरद्वार येथील सभांमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यास सर्व घुसखोरांना हकलून देण्याची मोठी ग्वाही दिली.

 दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद येथील सभेतून भाजप आणि निवडणूक आयोगावर पलटवार करत, राज्यातील विकासकामांत अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याचे आश्वासनही दिले आहे.

दक्षिण भारतात केरळमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून यूडीएफ (UDF) आणि एलडीएफ (LDF) या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत केरळच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'राजस्व' सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले.

 त्याचवेळी आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहा समुदायांना अनुसूचित जाती-जमातीचा दर्जा देण्याचे आणि चहा मळ्यातील कामगारांना दररोज ४५० रुपये मजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाचही राज्यांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाणारी ६५० कोटींहून अधिक किमतीची रोकड, दारू आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, यात पश्चिम बंगाल ३१९ कोटींसह अव्वल स्थानावर आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes