SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानातविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभाबळीराजाला मोठा दिलासा: अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्रीभोंदूगिरीविरुद्ध राज्य सरकारचा कडक पवित्रा; अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून १५०० कोटींच्या घोटाळ्याचा संशयसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्मयोगी भारत साधना सप्ताहात प्रशासनातील सर्वांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडमहाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटीलईस्टर संडे: पुनरुत्थानाचा सण आणि मानवतेचा नवा प्रवासईस्टर निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छाजयसिंगराव पवार यांच्या जाण्याने मराठा इतिहासाचा संदर्भग्रंथ काळाच्या पडद्याआड गेला : आमदार सतेज पाटील; कुटुंबियांची सांत्वनपर भेट

जाहिरात

 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: पंतप्रधान मोदींचा तृणमूलवर प्रहार, तर राहुल गांधींचे आसाममध्ये सभा

schedule05 Apr 26 person by visibility 111 categoryदेश

नवी दिल्ली : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून दिग्गज नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. कूचबिहार आणि अलीपुरद्वार येथील सभांमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यास सर्व घुसखोरांना हकलून देण्याची मोठी ग्वाही दिली.

 दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद येथील सभेतून भाजप आणि निवडणूक आयोगावर पलटवार करत, राज्यातील विकासकामांत अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याचे आश्वासनही दिले आहे.

दक्षिण भारतात केरळमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोड शो आणि जाहीर सभांच्या माध्यमातून यूडीएफ (UDF) आणि एलडीएफ (LDF) या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत केरळच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'राजस्व' सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले.

 त्याचवेळी आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहा समुदायांना अनुसूचित जाती-जमातीचा दर्जा देण्याचे आणि चहा मळ्यातील कामगारांना दररोज ४५० रुपये मजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाचही राज्यांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरली जाणारी ६५० कोटींहून अधिक किमतीची रोकड, दारू आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, यात पश्चिम बंगाल ३१९ कोटींसह अव्वल स्थानावर आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes