लोकशाही दिनी 17 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
schedule03 Aug 26 person by visibility 93 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'लोकशाही दिन' आज अप्पर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले.
आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण 17 अर्ज प्राप्त झाले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना वेळेत न्याय देण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.