SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्चधर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शनबाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्न

जाहिरात

 

वारीच्या सेवेतून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंढरपुरात 'निर्मलवारी-समृद्धवारी' व 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप संपन्न

schedule24 Jul 26 person by visibility 344 categoryराज्य

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती पंढरपूर येथे ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप संपन्न झाला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

चरणसेवा उपक्रमाद्वारे डॉक्टर व स्वयंसेवकांनी भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांच्या या सेवाभावातून भारताची युवा शक्ती, तसेच महाराष्ट्र धर्माचे खरे दर्शन घडते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी सुविधा पुरवणे शासनाचे कर्तव्य असून, २०१६ पासून सुरू झालेल्या ‘निर्मल वारी’ उपक्रमामुळे वारीत स्वच्छता आणि आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबतच इतर दिंड्यांसाठी ५ हजार फिरती शौचालये, १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर आणि पाणी पुरवठ्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. सुमारे ३० ते ३५ लाख वारकरी येऊनही पंढरपूर शहर स्वच्छ राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस दल, स्वच्छतादूत व वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणाऱ्या सर्व घटकांचे कौतुक केले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी, वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंग, हिरकणी कक्ष, रुग्णालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निष्ठेमुळे यंदाची वारी पूर्णपणे साथीच्या रोगांपासून मुक्त राहिल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात स्वच्छ भारत मोहिमेत महाराष्ट्र प्रथम आल्याबद्दल संचालक शेखर रौंदळ, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था आणि स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६’ बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास अनेक आमदार, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes