SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
साखर कारखान्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणी : विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले लक्षघराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणेमायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यकमहास्वच्छता मोहीमेत 30 टन कचरा संकलित; स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिक व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागघरफाळा थकबाकीपोटी मनीषा नगर येथील बारबेल्स जीम ऍ़न्ड फिटनेस सेंटर सीलहोळी लहान करा, शेणी दान करा : महापौर रुपाराणी निकम यांचे आवाहनभाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्चला कोल्हापुरात होणार कार्यकर्त्यांच्या रॅलीद्वारे जल्लोषी स्वागतसंवेदनशील, रचनात्मक शिक्षणातूनच सामाजिक समावेशन शक्य: प्रा. रेणू दांडेकरडॉ. डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकस्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना : संतोष रामाणेभाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील परिसंवादात सूर

जाहिरात

 

मेन राजाराममध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

schedule27 Feb 26 person by visibility 136 categoryशैक्षणिक

◼️मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान : डॉ.संतोष माने

 कोल्हापूर: मातृभाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती, इतिहास आणि ओळख टिकवून ठेवते.प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेतल्यास संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि सर्जनशीलता वाढते. इंग्रजी किंवा इतर जागतिक भाषांचे ज्ञान करिअर, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आवश्यक आहे. पण आपल्या मराठी भाषेविषयी आपणास नितांत आदर, आपुलकी असणे आवश्यक आहे असे मत डॉ संतोष माने यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत आयोजन केलेल्या मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ गजानन खाडे म्हणाले,"मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून तो आपला सांस्कृतिक वारसा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास आहे". तो स्वाभिमान, अभिमान या सोशल मीडियाच्या जमान्यात जपूया,हा संस्कृतीचा लामण दिवा तेवत ठेवूया.

    या दिवसाचे औचित्य साधून कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी  पत्रास कारण की हा उपक्रम घेण्यात आला.सद्यपरिस्थितीत मराठी भाषेची असणारी स्थिती याचे वास्तव चित्रण व्यक्त करणारे पत्र कविश्रेष्ठ कुसुमाग्रज,वि वा शिरवाडकर यांना लिहून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या पत्रात मांडल्या.‌ यामध्ये सलोनी बारे, श्रेया कळंत्रे ,मेहजबीन मुल्लाणी,सिद्धी शरद पाटील,संध्या पोवार,जान्हवी शेवरे,स्वराजंली पाटील, अनुराधा सिद्धनेर्ली, प्रियांका यादव या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सलोनी बारे,श्रेया कळंत्रे या विद्यार्थिनींनी  मनोगत व्यक्त केले..

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक  बाबासाहेब माळवे, फलकलेखन विकास पाटील, सूत्रसंचालन सुषमा पाटील, आभार अनिल लाड यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्या वनिता खडके, बाबुराव यादव, हर्षवर्धन काटकर,संजय कुंभार, राहूल देशमुख, अयोध्या धुमाळ,दिपा लोहार, प्रमिला मळगे,राजू मोरे, संगिता चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes