SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यूफ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवडशाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीरड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार:पालकमंत्री हसन मुश्रीफकोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरूखेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षणखरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकारकोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पणसुवर्णतुला: हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात

जाहिरात

 

कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम यांच्या ऋषिकेश दौऱ्यामुळे ५ जूनचा जनता दरबार ११ जून रोजी होणार

schedule03 Jun 26 person by visibility 358 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, नवी दिल्ली यांच्या वतीने उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ११७ व्या बैठकीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रुपाराणी निकम उपस्थित राहण्यासाठी रवाना झाल्या आहेत. 

देशातील विविध महानगरपालिकेच्या महापौर या बैठकीस उपस्थित राहणार असून स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी सुविधा, शहरी विकास, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच महानगर प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्सचे सचिव मनोज गुप्ता यांनी पाठविलेल्या निमंत्रणानुसार सदर बैठक दि.३ जून  रोजी ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख महानगरांतील महापौर सहभागी होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उत्तम उपक्रमांची देवाणघेवाण तसेच विविध विकासात्मक विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.

महापौर रुपाराणी निकम यांच्या या अधिकृत दौऱ्यामुळे दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित करण्यात येणारा जनता दरबार यावेळी नियोजित तारखेला होऊ शकणार नाही. त्यामुळे जून महिन्यातील जनता दरबार गुरुवार दिनांक ११ जून  रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

जनता दरबारामध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना व विविध नागरी विषय थेट महापौरांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे सर्व नागरिकांनी जनता दरबाराची सुधारित तारीख लक्षात घेऊन दिनांक ११ जून  रोजी उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes