SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक वारशाचे रक्षक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनशक्तीपीठ महामार्गाविरोधात सोमवारी सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावाकोल्हापूर : स्विमिंग पूलमध्ये बुडून दहावीतील विद्यार्थ्याचा अंतसार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस७००हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे?डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवडवाढत्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अभिनव 'विडंबनात्मक' आंदोलनआपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड बेळगावच्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात कोल्हापूरचा डंका! ३ महिला कवयित्रींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानजागतिक उच्च रक्तदाब दिन: शांत आव्हानाचा सामना करण्यासाठी जागरूकतेची गरज

जाहिरात

 

७००हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे?

schedule17 May 26 person by visibility 399 categoryसामाजिक

▪️आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सवाल; प्रकाश बेलवाडे याचा घेतला खरपूस समाचार    
        
नानीबाई चिखली : कोल्हापूर जिल्हा ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या भूमीत हिंदू धर्माच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे बांधणारे मंत्री हसन मुश्रीफ जिहादी कसे? असा रोकडा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी केला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश बेलवाडे याच्याकडून जर हा धर्मवाद, जातिवाद पेरला जात आहे. हे असले प्रकार चालू देणार नाही, असेही ते म्हणाले.
         
नानीबाई चिखली ता. कागल येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  कांबळे बोलत होते.
          
मंत्री  मुश्रीफ यांच्यावर सतत जातीयवादी आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे याच्या जातीयवादी वक्तव्यांचा संदर्भ घेत  कांबळे पुढे म्हणाले, मंत्री  मुश्रीफ यांनी सर्वधर्मसमभाव या न्यायाने राजकारण आणि समाजकारण केले. तुम्ही ज्यांना जिहादी म्हणता त्यांनी हिंदूंच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे उभारली आहेत. मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होत सगळ्याच देव देवतांच्या पूजेलाही ते बसले आहेत. एवढ्या मोठ्या मनाचा आमदार आम्हा जनतेला लाभलेला असताना तुम्ही त्यांना जिहादी कसे म्हणता? अशा जातीयवादी विचारांच्या माध्यमातून संविधानच मोडून काढायचे काम होत असेल तर आपण स्वस्थ बसता कामा नये. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत वर्षाला दिलेले संविधान आणि महामानवांचे विचारच तुम्हा- आम्हाला तारणारे आहेत.
            
▪️शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांना काळीमा....
 कांबळे पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. या समतावादी जिल्ह्यात जाती- धर्माच्या नावाने कोणी विद्वेष पेरत असेल तर तो शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांना काळीमा फासल्यासारखे आहे. काही अपप्रवृत्तींकडून या महापुरुषांच्या विचारांचा खून होत असेल तर हा जिल्हा कदापिही सहन करणार नाही. महामानवांचा विचार कलंकित होता कामा नये.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes