कोल्हापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा रोजचा कचरा उठाव करावा; कर्तृत्व संस्थेतर्फे प्रशासक के. मंजूलक्ष्मी याना निवेदन
schedule19 Jun 25 person by visibility 246 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कर्तृत्व या सामाजिक संस्थेतर्फे हॉटेल व्यावसायिकांचा रोजचा कचरा उठाव करावा या मागणीचे निवेदन महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी याना देण्यात आले.
कोल्हापूर शहरात अनेक छोटे मोठे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांचा रोजचा ओला कचरा निर्माण होत असतो. तो घेण्यासाठी महानगरपालिकेच्या घंटा गाडी तयार होत नाहीत. या कचऱ्याचे योग्य नियोजन होण्याची गरज आहे. कचऱ्याचा रोजचा उठाव होत नसल्यामुळे अनेक व्यावसायिक कचरा खुल्या जागेत टाकताना दिसतात. यामुळे शहरात दुर्गंधी पसरून निरनिराळे आजार बळकावू शकतात. कोल्हापूर चा पर्यटन दृष्टीने विकास होण्यासाठी अश्या कचऱ्याचा उठाव होणे वे त्याचे योग्य नियोजन होणे खूप गरजेचे आहे.
सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून व्यावसायिक दराने फाळे घेतले जातात. तसेच हॉटेल व्यवसायातून येणार GST कर सुद्धा शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात भर घालत आहे.
तरी महानगरपालिकेतर्फे घंटा गाडीमार्फत, ठराविक वजनापर्यंतचा रोजचा कचरा उठाव करण्याची सोय करावी, अशा मागणीचे निवेदन कर्तृत्व तर्फे महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी याना देण्यात आले.
यावेळी कर्तृत्वचे संस्थापक अध्यक्ष विराज सरनाईक, विनीत जिरगे, मयुरी पाटील, मंजिरी दाणी, स्नेहा सरनाईक, अनुराग गोळे, शिवाजी यादव, तेजस पाटील, बापू पंडित, प्रतीक हेगिष्ट्ये, संजय जाधव आदी उपस्थित होते.