SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंदशिवाजी विद्यापीठात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे दर्शन तीन महिन्यांपासून जोडीचे वास्तव्य; समृद्ध व सुरक्षित जैवविविधतेवर शिक्कामोर्तबकुक्कुट पालन प्रशिक्षणार्थींनी संपर्क साधण्याचे आवाहनकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी10 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित; कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा मुबलक साठाजयसिंगपूर येथे नूतन बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण : एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व सुलभ प्रसाधनगृह मोफत करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग; शिवाजी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय परिषदेत द्वितीय क्रमांक समूह विद्यापीठांनी मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहावे: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कुलगुरूंच्या बैठकीत सल्लाभारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादनउष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी

schedule17 Apr 26 person by visibility 120 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालय, जिल्हाधिकारी व महानगरपालिका स्तरावर, दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तरावर आणि तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर ‘लोकशाही दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाखल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिका स्तरावरील तक्रारी या संबंधित महानगरपालिका कार्यालयाकडेच दाखल करणे आवश्यक आहे.

परिपत्रकानुसार, महानगरपालिकेशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचे अध्यक्ष हे संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतात. त्यामुळे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित तक्रारी त्या त्या महानगरपालिका कार्यालयातच सादर कराव्यात.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र वगळता इतर भागाशी संबंधित तक्रारीच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes