SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार यांची निवडभविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरु

जाहिरात

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भारतीय लोकशाहीला मिळाला न्याय, महायुतीला पुन्हा मिळणार निर्विवाद जनाधार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

schedule07 May 25 person by visibility 250 categoryराजकीय

कोल्हापूर  : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे लोकशाहीला न्याय मिळाला असून, राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदार यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. गेली चार वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक विकास कामे रखडली होती. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत पारदर्शी आणि वस्तुस्थितीजन्य भूमिका घेत,  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे  गरजेचे आहे, याबद्दल आग्रही सादरीकरण केले.  त्यामुळेच आज सर्वोच्च न्यायालयाने थेट आणि स्पष्ट भूमिका घेऊन, महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. 

एक अर्थाने हा मतदार राजासाठी आनंदाचा दिवस आहे. ज्या पद्धतीने राज्यातील विधानसभा निवडणुकात भाजप - शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून जनतेसमोर जात निर्विवाद कौल मिळवला, त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळेल, याची खात्री वाटते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर देशभरातील जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दाखवला. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित  पवार यांच्या ट्रिपल इंजिन सरकारने, जनहिताच्या अनेक योजना यशस्वी केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अगदी ग्रामपंचायत निवडणुकीतही महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, याची खात्री आहे. गाव पातळीपासून ते शहर, राज्य आणि देशपातळीवर भाजप सरकारने विकासाचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला संपूर्ण बहुमत मिळेल,  याचा विश्वास वाटतो.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes