SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु : मंगलप्रभात लोढा; जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटननूतन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाजपा जिल्हा कार्यालयात जल्लोषी स्वागतशेती केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार : उपमुख्यमंत्री अजित पवारजग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकसकाळ आणि घोडावत विद्यापीठांतर्गत 'समर युथ समिट' ३, ४ जून रोजी कोल्हापुरात‘गोकुळ’ मार्फत सी.पी.आर.रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत दूध वाटप...शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवा, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या, कृषी विज्ञान केंद्रांशी सतत संपर्क ठेवा; खा. धनंजय महाडिक यांनी शेतकऱ्यांशी साधला संवादकिमान 10 जूनपर्यंत पावसात घट; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेपहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीतघरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

जाहिरात

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक

schedule30 May 25 person by visibility 286 categoryराजकीय

कोल्हापूर  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील 15 दिवसांत तालुकास्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत काम करावे असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. आज अजिंक्यतारा येथे घेतलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत मार्गदर्शन त्यांनी मार्गदर्शन केले.

 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या बैठका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आढावा घेण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आ. जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे राहुल पी एन पाटील व्ही बी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली.

यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, निवडणुका या लोकशाही  . एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन लढवूया. कोणतेही हेवे दावे न ठेवता,भांडण तंटा न करता एकमेकांमध्ये समन्वय ठेवून लढवूया आणि जिंकूया. . यासाठी सर्वांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे असे सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील 15 दिवसांत तालुकास्तरावरील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत. आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचना, राजकिय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचण्यासाठी सर्वांनी संघटीत काम करावे असं आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. 

यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, बाबासो देवकर, भारती पोवार, सुभाष जाधव, अनिल लव्हेकर अशा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी  शिवसेना उपनेते संजय पवार, आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, वसंत पाटील, उदय नारकर, बाळासाहेब सरनाईक, अनिल घाटगे, डी.जी. भास्कर, व्यंकाप्पा भोसले, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडी, तौफीक मुल्लाणी, विशाल देवकुळे, सुनिल देसाई आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes