SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांकदेशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणसारथी अंतर्गत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधीआत्मा योजनेंतर्गत गुडाळ येथे शनिवारी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली; योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षकअलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिकाशिवाजी विद्यापीठातील प्रियंका पवारची जर्मनीतील हॅनोवर विद्यापीठामध्ये समर स्कूल प्रोग्रामसाठी निवडप्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवादसिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदानडीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड

जाहिरात

 

डॉ. बाबासाहेबांच्या कार्यास राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम आधार व पाठींबा: डॉ. सुनीलकुमार सरनाईक; रजपूतवाडी आश्रमशाळेत व्याख्यान

schedule21 May 25 person by visibility 365 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : "डॉ. बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या कार्यास राजर्षी शाहू महाराजांचा भक्कम आधार व  पाठींबा, तसेच सहकार्य होते, त्यामुळे त्यामुळेच डॉ.बाबासाहेब यांचे मनोधैर्य वाढले" असे प्रतिपादन समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांनी केले.

 रजपूतवाडी येथील भटका व विमुक्त समाज विकास मंडळ, संचलित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने डॉ.सरनाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी भटका व विमुक्त समाजाचे नेते,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले होते.

डॉ.सरनाईक म्हणाले," अस्पृश्य समाजातील डॉ. बाबासाहेबांच्या सारखा तरुण उच्च शिक्षण घेऊन दलितांच्या प्रश्नांवर आपली वाणी, लेखणी व बुध्दीचातुर्य वापरून त्यांच्या उद्धारासाठी झटतो आहे, हे राजर्षींचे सहकारी दत्तोबा पोवार याच्या कडून  ऐकून शाहू महाराज मनातून खूपच सुखावले होते,  त्यामुळेच १९१९ साली मुंबईत परळ येथील बाबासाहेब ज्या चाळीत रहात होते, तेथे जाऊन शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब यांची भेट घेतली, ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील समाजपरिवर्तनाची नांदी ठरली आहे."

डॉ.सरनाईक यांनी उभयतांच्या भेटी बरोबरच डॉ . बाबासाहेब यांची कोल्हापूरातील भेटीवेळी महाराजांनी आयोजित केलेल्या सहभोजनाची, मुकनायक या वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी केलेली आर्थिक मदत, माणगाव परिषदेतील शाहू महाराजांनी केलेले भाषण, तसेच नागपूर परिषदेच्या निमित्ताने शाहू महाराजांनी केलेली मदत व दलितांना बाबासाहेबांच्या रुपाने दिलेला पुढारी याविषयी साद्यंत माहिती दिली.

 यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते प्रा.डॉ. अनिल माने,  संस्थेचे कार्यवाह प्रा. सुनिल भोसले, शिल्पा भोसले ,रेखा भोसेले,तानाजी नंदिवाले, मुख्याध्यापक शिवाजी कोरवी, मुख्याध्यापक  कृष्णा पाटील, विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 
प्रदीप उबाळे, प्रास्ताविक निशिगंधा नलवडे व आभार प्रकाश वर्षे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व रजपूतवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes